sunilprem

Friday, January 12, 2007

प्रेमात सगळ असच असत..

किती रे छळतोस मला?
नदि सागराला म्हणाली
अन् कोसळनाऱ्या प्रत्येक् लाटेत
माझे अस्तित्व भिजवतोस्...

भिजवणारा ओलावा माझ्यात् कधिच् नव्हता..
नदिला कवेत् घेत् सागर् हळुच म्हणाला,
विचार् त्या सुर्याला
दररोज माझ्यात बुडुन् सुध्दा..
तो मात्र् कोरडाच उरलाय

तुझ माझ्यावर् प्रेमच नाहि
आज् चन्द्र सुध्दा आकाशावर रागवला
अन् विझत जानाऱया डोळ्याने
उगवत्या सुर्याकडे पाहत् राहिला


प्रेम तुझ्यावर नाहितर कुणावर करणार
आरक्त नजरेने आकाश बोलल...
अन् ताऱ्याना अन्धारात् पेटवुन कोणाचि वाट बघणार?
प्रेमात सगळ असच असत..
तो मनाशिच् म्हणाला
अन् पुन्हा तिचि वाट् बघत्
वाळुत् घरे बान्धत राहिला!!!

0 Comments:

Post a Comment

<< Home