sunilprem

Saturday, January 13, 2007

कोणी गेलं म्हणुन.......

कोणी गेलं म्हणुन
आपण आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं,
जगायचा असतो प्रत्येक क्षण
उगाच श्वासांना लांबवुन ठेवायचं नसतं.
आठवणींच्या वाटांवरुन
आपल्या स्वप्नांपर्यत पोहचायचं असतं,
आभाळापर्यत पोहचता येत नसतं
कधी त्याला खाली खेचायचं असतं.
कसं ही असलं आयुष्यं
आपलं मनापासुन जगायचं असतं,
कोणी गेलं म्हणुन
उगाच आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं.
दिवस तुझा नसेलही,
रात्र तुझीच असेलत्या रात्रीला
नवं स्वप्न मागायचं असतं,
तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं.

0 Comments:

Post a Comment

<< Home